WhatsApp Group (Join Now) Join Now
Telegram Group (Join Now) Join Now

15 जून 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

चालू घडामोडी (१५ जून २०२२)

‘अग्निपथ योजने’ची संरक्षण मंत्र्याकडून घोषणा :

  • भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलांसाठी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे.
  • तर या अंतर्गत भारताच्या तिन्ही सैन्यात चार वर्षांसाठी तरुणांची भरती केली जाणार आहे, ज्याला ‘टूर ऑफ ड्यूटी’असे नाव देण्यात आले आहे.
  • दोन आठवड्यांपूर्वी नौदल, लष्कर आणि हवाई दलाच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अग्निपथ योजनेची माहिती दिली होती.
  • तसेच लष्करी व्यवहार विभाग त्याची अंमलबजावणी करत आहे.
  • तर चार वर्षांनंतर, या योजनेंतर्गत भरती झालेल्या 80 टक्के तरुणांची सेवा समाप्त केली जाणार आहे.
  • उरलेल्या 20 टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याच पुन्हा संधी मिळणार आहे.
  • सध्या भारतीय सशस्त्र दलाचे सरासरी वय 32 वर्षे आहे. ही योजना लागू झाल्यानंतर ही योजना 24 ते 26 वर्षांची असेल.

केंद्राकडून दीड वर्षांत 10 लाख नोकऱ्या :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विविध केंद्र सरकारी विभाग आणि मंत्रालयांना आगामी दीड वर्षांत दहा लाख नोकरभरती करण्याची सूचना दिली आहे.
  • मोहिमेप्रमाणे ही भरतीप्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
  • पंतप्रधान कार्यालयातर्फे मंगळवारी ही माहिती देण्यात आली.
  • पंतप्रधान कार्यालयाने सर्व सरकारी विभाग व मंत्रालयातील मनुष्यबळाचा आढावा घेतल्यानंतर पंतप्रधानांनी या सूचना दिल्या.
  • सरकारच्या अनेक विभागांत रिक्त असलेल्या पदांचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे.

भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश :

  • येत्या काळात वायू प्रदूषणामुळे भारतीयांचे आयुर्मान पाच वर्षांनी कमी होण्याची शक्यता आहे.
  • शिकागो विद्यापीठातील ऊर्जा धोरण संस्थेने (ईपीआयसी) यासंदर्भात एक अहवाल जारी केला आहे.
  • तर या अहवालात म्हटले आहे की, नवी दिल्लीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात लोक मोठ्या प्रमाणात प्रदुषित भागांमध्ये राहतात.
  • तसेच, गेल्या काही वर्षात भारताच्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार झाला असून हवेची गुणवत्ता लक्षणीय खराब झाली आहे.
  • वायू प्रदूषण हा भारतातील मानवी आरोग्यासाठी सर्वात मोठा धोका आहे.
  • दिल्ली हे भारतातील सर्वात जास्त प्रदुषित राज्य आहे. जागतिक स्तरावर भारत हा जगातील दुसरा सर्वात प्रदूषित देश आहे.
  • भारतात 2020 साली खराब हवेमुळे नागरिकांचे आयुर्मान 6.9 वर्षांनी कमी झाले.

भारतीय संघ आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र :

  • पॅलेस्टाइनने ‘ब’ गटातील सामन्यांत फिलिपिन्सला 4-0 अशा फरकाने पराभूत केल्याने भारतीय पुरुष फुटबॉल संघटना मंगळवारी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला.
  • तर या विजयामुळे पॅलेस्टाइनने गटात अग्रस्थान मिळवत 24 संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवला, तर फिलिपिन्स चार गुणांसह दुसरे स्थान मिळवूनही अपात्र ठरला.
  • भारत प्रथमच सलग दुसऱ्यांदा आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
  • 2019 मध्ये भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले होते.

भारताचा ‘गोल्डन बॉय’मैदानावर उतरण्यास सज्ज :

  • भारताचा ऑलिम्पिक हिरो नीरज चोप्रा या आठवड्यात पुन्हा एकदा मैदानावर उतरण्यासाठी करण्यासाठी सज्ज झाला आहे.
  • फिनलंडमध्ये होणाऱ्या पावो नुर्मी गेम्स 2022 या स्पर्धेमध्ये तो भाग घेणार आहे.
  • टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा असेल.
  • युग फिनलंडमधील तुर्कू येथील पावो नूरमी स्टेडियममध्ये पावो नूरमी गेम्स 2022ची सुरुवात झाली.
  • पावो नुरमी खेळ ही एकमेव स्पर्धा आहे जागतिक अॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूरमधील दुसरी प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धा आहे.
  • तर डायमंड लीग पोवो नूरमी गेम्सचा क्रमांक लागतो.

माजी खेळाडू आणि पंचांसाठी बीसीसीआयचा मोठा निर्णय :

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या सर्व माजी क्रिकेटपटू आणि माजी पंचांच्या निवृत्ती वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच ज्या आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूंना आतापर्यंत 30 हजार रुपये मिळत होते, त्यांना आता 52 हजार 500 रुपये मिळणार आहेत.
  • याशिवाय 2003 पूर्वी निवृत्त झालेल्या आणि 22 हजार 500 रुपये निवृत्ती वेतन मिळणाऱ्या प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आता ४५ हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे.
  • इंडियन प्रीमियर लीगमधून मिळणारी कमाई भविष्यात खेळाडूंच्या सुविधा आणि गरजांवरही वापरली जाऊ शकते, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे.

दिनविशेष :

  • १५ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय हवा दिन‘ आहे.
  • वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जॉन बॅप्टिस्ट डेनिस यांनी १५ जून १६६७ मध्ये यशस्वी रक्तसंक्रमण केले.
  • १५ जून १८६९ मध्ये महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.
  • लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे ‘समाजसेवक अण्णा हजारे‘ यांचा जन्म १५ जून १९३७ रोजी झाला.
  • b.p तुम्ही आहात 15 जून 1970 रोजी पुणे विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.

इतरांना शेअर करा .......

Latest Post

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.