29 जून 2022 चालू घडामोडी


व्हाट्सएप ग्रुप   येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप   येथे क्लीक करा
इतरांना शेअर करा .......

दीपक हुडा

चालू घडामोडी (२९ जून २०२२)

सरकारी योजनांची जबाबदारी लवकरच सहकारी बँकांवर :

  • सहकारी बँकांकडे सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी लवकरच दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली.
  • गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (कृषी बँक) 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते.
  • आतापर्यंत सरकारच्या आधार कार्ड-एटीएम-मोबाईलद्वारे थेट लाभ हस्तांतरण योजना (जेएएम-डीबीटी) राबवण्यात सहकार क्षेत्राचा संबंध नव्हता.
  • परंतु आता सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • शहा म्हणाले, की ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी) योजनेतून निधी सरकारकडून जन धन खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या (जेएएम) समन्वयातून लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात.
  • सरकारी अनुदानाशी संबंधित अनियमितता दूर करण्यासाठी सरकार जन धन खाते, आधार आणि मोबाइल क्रमांक एकमेकांशी जोडू इच्छित आहे.
  • सध्या 52 मंत्रालये ‘जेएएम’द्वारे लाभार्थीना मदत करण्यासाठी ‘dbt’ अमलात आणत आहेत.
  • अशा प्रकारे सुमारे 300 सरकारी योजनांच्या लाभार्थीच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जाते.

मुकेश अंबानींचा रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा :

  • रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
  • मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
  • मंगळवारी रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
  • यानुसार आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यानुसार, पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती 5 वर्षांसाठी आहे.
  • रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तेलंगणात शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना :

  • तेलंगणा सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी रयतू बंधू गुंतवणूक मदत योजना सुरू केली, असे राज्य सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
  • राज्याचे कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांनी सांगितले की, पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत 586 कोटी 65 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
  • शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना राबविणारे तेलंगण हे देशातील पहिले राज्य ठरले असून भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनीही कधी अशी योजना राबविलेली नाही, असे रेड्डी म्हणाले.
  • शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकांच्या खरेदीसाठी राज्य सरकारने हंगामासाठी एकरी ५ हजार रुपये दिले.

भारतीय संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली जिंकली मालिका :

  • भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला.
  • शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारताने चार धावांनी जिंकला.
  • या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे.
  • शताब्दी दीपक हुडा आणि अर्धशतकी खेळी केलेला संजू सॅमसन हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
  • दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्माच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला.
  • आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला.
  • त्याच्यापूर्वी केएल राहुल, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी शतके झळकावली आहेत.

ईऑन मॉर्गन निवृत्त :

  • ईऑन मॉर्गनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपदही सात वर्षांहून अधिक काळानंतर सोडले.
  • 2015 च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोनासाठी मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.
  • मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखवला.
  • त्याच्या नेतृत्व कारकीर्दीतच इंग्लंड संघाने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 प्रकारात अग्रस्थान पटकावले.

हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे निधन :

  • ज्येष्ठ भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे जलंधरमध्ये निधन झाले.
  • भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवून देण्यामध्ये पंजाब आणि हरियाणामधील अनेक खेळाडूंनी आपले योगदान दिले होते.
  • त्यामध्ये ऑलिंपिक पदक विजेता आणि विश्वचषक विजेता वरिंदर सिंग यांचाही समावेश होता.
  • वरिंदर सिंग हे 1975मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
  • तर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे हे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक आहे.
  • 2007 मध्ये भारतीय हॉकीतील योगदानासाठी वरिंदर सिंग यांना प्रतिष्ठित ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दिनविशेष :

  • १८७० मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
  • मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना 2001 या वर्षी एम.पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
  • पं.हृदयनाथ मंगेशकर यांना 2001 या वर्षी नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
  • वर्ष 2007 मध्ये ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

इतरांना शेअर करा .......

नमस्कार मित्रांनो , माझे शिक्षण B. A. Political Science मध्ये झाले आहे .आणि मला BLOGING ची आवड असल्याने माझ्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम माझे मित्र जे की ग्रुप C आणि ग्रुप D ची तयारी करत आहे . त्यांना माझ्या पोस्ट च्या माध्यमातून फ्री टेस्ट EXAM देता यावी व जास्तीत जास्त सराव करून त्यांनी यश संपादन करावे हीच माझी ईश्वरचारणी प्रार्थना आहे .

Leave a Comment