29 जून 2022 चालू घडामोडी

इतरांना शेअर करा .......

दीपक हुडा

चालू घडामोडी (२९ जून २०२२)

सरकारी योजनांची जबाबदारी लवकरच सहकारी बँकांवर :

  • सहकारी बँकांकडे सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची जबाबदारी लवकरच दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी मंगळवारी केली.
  • गुजरात राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या (कृषी बँक) 70 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते.
  • आतापर्यंत सरकारच्या आधार कार्ड-एटीएम-मोबाईलद्वारे थेट लाभ हस्तांतरण योजना (जेएएम-डीबीटी) राबवण्यात सहकार क्षेत्राचा संबंध नव्हता.
  • परंतु आता सहकारी बँकांच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • शहा म्हणाले, की ‘थेट लाभ हस्तांतरण’ (डीबीटी) योजनेतून निधी सरकारकडून जन धन खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाच्या (जेएएम) समन्वयातून लाभार्थीच्या बँक खात्यात जमा केले जातात.
  • सरकारी अनुदानाशी संबंधित अनियमितता दूर करण्यासाठी सरकार जन धन खाते, आधार आणि मोबाइल क्रमांक एकमेकांशी जोडू इच्छित आहे.
  • सध्या 52 मंत्रालये ‘जेएएम’द्वारे लाभार्थीना मदत करण्यासाठी ‘dbt’ अमलात आणत आहेत.
  • अशा प्रकारे सुमारे 300 सरकारी योजनांच्या लाभार्थीच्या खात्यावर थेट रक्कम पाठवली जाते.

मुकेश अंबानींचा रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा :

  • रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
  • मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे.
  • मंगळवारी रिलायन्स उद्योग समुहाकडून या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
  • यानुसार आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • यानुसार, पंकज मोहन पवार यांची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झाली. ही नियुक्ती 5 वर्षांसाठी आहे.
  • रमिंदर सिंग गुजराल व के. व्ही. चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तेलंगणात शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना :

  • तेलंगणा सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी रयतू बंधू गुंतवणूक मदत योजना सुरू केली, असे राज्य सरकारच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
  • राज्याचे कृषिमंत्री निरंजन रेड्डी यांनी सांगितले की, पहिल्याच दिवशी राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत 586 कोटी 65 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
  • शेतकऱ्यांसाठी गुंतवणूक मदत योजना राबविणारे तेलंगण हे देशातील पहिले राज्य ठरले असून भाजप किंवा काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनीही कधी अशी योजना राबविलेली नाही, असे रेड्डी म्हणाले.
  • शेतकऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकांच्या खरेदीसाठी राज्य सरकारने हंगामासाठी एकरी ५ हजार रुपये दिले.

भारतीय संघाने हार्दिकच्या नेतृत्वाखाली जिंकली मालिका :

  • भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील दुसरा सामना डबलिनमधील ‘द व्हिलेज स्टेडियम’वर (मालाहाइड) खेळवण्यात आला.
  • शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारताने चार धावांनी जिंकला.
  • या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आहे.
  • शताब्दी दीपक हुडा आणि अर्धशतकी खेळी केलेला संजू सॅमसन हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
  • दीपक हुडाने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावत रोहित शर्माच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला.
  • आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक झळकावणारा तो चौथा खेळाडू ठरला.
  • त्याच्यापूर्वी केएल राहुल, रोहित शर्मा, सुरेश रैना यांनी शतके झळकावली आहेत.

ईऑन मॉर्गन निवृत्त :

  • ईऑन मॉर्गनने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करतानाच इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचे कर्णधारपदही सात वर्षांहून अधिक काळानंतर सोडले.
  • 2015 च्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक दृष्टिकोनासाठी मॉर्गनकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती.
  • मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने 2019 मध्ये प्रथमच एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम दाखवला.
  • त्याच्या नेतृत्व कारकीर्दीतच इंग्लंड संघाने एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 प्रकारात अग्रस्थान पटकावले.

हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे निधन :

  • ज्येष्ठ भारतीय हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे जलंधरमध्ये निधन झाले.
  • भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवून देण्यामध्ये पंजाब आणि हरियाणामधील अनेक खेळाडूंनी आपले योगदान दिले होते.
  • त्यामध्ये ऑलिंपिक पदक विजेता आणि विश्वचषक विजेता वरिंदर सिंग यांचाही समावेश होता.
  • वरिंदर सिंग हे 1975मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते.
  • तर या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे हे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक आहे.
  • 2007 मध्ये भारतीय हॉकीतील योगदानासाठी वरिंदर सिंग यांना प्रतिष्ठित ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दिनविशेष :

  • १८७० मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने कामगार संघटनांना परवानगी देणारा कायदा केला.
  • मराठी नाटककार, विनोदकार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचा जन्म 29 जून 1871 मध्ये झाला.
  • ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्ण दामोदर अभ्यंकर यांना 2001 या वर्षी एम.पी. बिर्ला पुरस्कार जाहीर.
  • पं.हृदयनाथ मंगेशकर यांना 2001 या वर्षी नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार जाहीर.
  • वर्ष 2007 मध्ये ऍपल ने आपला पहिला मोबाईल फोन, आयफोन प्रकाशित केला.

इतरांना शेअर करा .......

Leave a Comment